रविवार, २७ जुलै, २०१४

pikale pan

        मी एक पिकले पान ! कोणत्याही क्षणी झाडावरून गळून पडेन . म्हणूनच मी माझे मनोगत तुमच्यापुढे मांडत आहे. झाडावरचे आमचे आयुष्य म्हणजे एक, दोन, किंवा तीन ऋतू . प्रत्येक ऋतू मुळे आम्हाला नवनव्या गोष्टी अनुभवायला मिळतात .
          ग्रीष्माच्या कडाक्याने बरीच वृक्ष-वल्ली ओकी-बोकी झालेली असते. मग येतो वसंत. सर्व वृक्ष-वल्ली एखाद्या जादुगाराने जादूची छडी फिरवल्यावर कायापालट होतो ना ? अगदी तसाच निसर्गाचा कायापालट होऊ लागतो. प्रत्येक झाडाला नवीन पालवी फुटते . सगळी वसुंधरा जणू चैतन्यमय होऊ लागते . चैत्र महिन्यापासून ते श्रावण महिन्या पर्यंत सृष्टीत सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. सगळी सृष्टी आनंदाने डोलत असते. संपूर्ण जीव सृष्टी आनंदमय होऊन जाते.
           आमचे पानांचे आयुष्य फक्त तीन ते नऊ आठवडे . यातही आम्ही संपूर्ण जीव सृष्टी साठी झटत असतो. हिवाळ्यात झाडांना पालवी आल्यापासून उन्हाळ्या पर्यंत झाडांची पाने हिरवीगार असतात. तेव्हा आम्ही पाने सूर्य प्रकाश, क्लोरोफिल, पाणी यांच्या सहाय्याने जोमाने अन्न तयार करण्याचे काम करत असतो. या वेळेस देखील पानांमध्ये इतर रंग असतात; पण क्लोरोफिलच्या मुळे ते दिसून येत नाही. उन्हाळा संपला कि सूर्य प्रकाश कमी होऊ लागतो. मग आमचा हिरवा रंग कमी होऊ लागतो. आणि दोन-तीन आठवड्यातच आम्ही पिकली पाने झाडावरून गळून जमिनीवर पडतो.  

मंगळवार, २२ जुलै, २०१४

Lokmanya Bal Gagadhar Tilak

        "माझा आवडता नेता " म्हणजे लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक . आजकाल पावसाळ्यात उगवणाऱ्या भू छत्रासारखे अचानक उगवणारे नेते मंडळी आपण टीव्हीवर सतत पाहतच असतो. समाज सेवा म्हणजे काय? याचा साधा अर्थ सुद्धा यांच्या लेखी नसतो. स्वतःची मलिन झालेली प्रतिमा पांढरे झगे घालून समाज सेवकाची पाटी  लावून समाज सेवक असल्याचा देखावा करायचा . अडल्या नडल्या लोकांना अजून त्रास द्यायचा आणि आपली तुंबडी भरून घ्यायची .  थोडक्यात काय तर  पांढर पेशी दरोडेखोर.
        इंग्रजांच्या गुलाम गिरितुन भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे अठराव्या शतकातील नेते मंडळीच मनाला स्पर्शून जातात . स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून देशासाठी बलिदान करणारे हि नेते मंडळी , यांच्या पासंगाला तरी आजची नेते मंडळी उभी राहू शकतात काय? त्याकाळी ब्रिटीशांच्या विरोधात ब्र काढायची सोय नव्हती . भारतीयांची अवस्था मुके-बहिरे , अपंग अशी होति. कितीही  छळ  झाला तरी निमुटपणे सहन करण्यावाचून गत्यंतर नव्हते. जर का कोणी या अन्याया विरोधी आवाज उठवलाच तर तो "राज द्रोह " ठरत असे. अश्या काळी लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सरकार विरोधी आवाज उठवला . स्वतः उच्च शिक्षित असून त्यांनी समाज सेवेचे व्रत अंगिकारले . प्रथम ते बी. ए . झाले , नंतर एल . एल. बी . चे शिक्षण घेऊन पदवी मिळवली . पण त्यांनी या शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी न करता देशासाठी केला . त्यांना राष्ट्र सेवेसाठी जीवन अर्पण करायचे होते .
            टिळकांचा जन्म रत्नागिरी येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला . त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर व आईचे  नाव पार्वतीबाई  असे होते . त्यांचे पूर्वज सात-आठ  पिढ्या चिखली गावचे खोत म्हणून प्रसिद्ध होते . त्यांचे वडील शिक्षक  होते आणि संस्कृतचे पंडित होते. टिळक लहानपणा पासूनच हुशार होते. गणित विषयाची त्यांना फार गोडी होती . टिळकांना अन्याया बद्दल लहानपणा पासूनच चीड होती . पुढे त्यांच्या वडिलांची बदली पुण्याला झाली . तेथे त्यांना वेगवेगळ्या प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली .
          १८७२ मध्ये त्यांनी डेक्कन कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . तेथे त्यांच्या देह यष्टीवर सर्व मुले हसत असत . म्हणून त्यांनी कसरत करून एका वर्षात आपली मजबूत देहयष्टी बनवली . त्य बरोबरच कुस्ती, पोहणे, नौका चालन  हे त्यांचे आवडते खेळ होते . १८९६ ते १८९७ या काळात प्लेगची साथ आली . हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी  ryand  या अधिकाऱ्याची  निवड झाली . त्याने निर्जन्तू करणा च्या नावाखाली देव, देवघरांचा मान ठेवला नाही. त्याच्या सैन्याने लोकांवर अतोनात अत्याचार केले. त्यावर टिळकांनी केसरी व मराठा वर्तमान पत्रातून randchya कार्य पद्धतीवर आसुड  ओढले  . त्यानंतर चाफेकर बंधूनी रानड व त्याच्या सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली . या प्रकारामुळे चाफेकर बांधून फाशी देण्यात आली . तेव्हा टिळकांनी "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का "? व "राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे" हे दोन अग्र लेख लिहिले. म्हणून त्यांच्यावर राज द्रोहाचा खटला भरण्यात आला .व त्यांना सश्रम कारावासाची १८ महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली .
           धर्मनिरपेक्ष विषयांवर लोकांनी एकत्र येण्यासाठी त्यांनी गणेशोस्तव व शिवजयंती हे उत्सव सुरु करून लोकांना आपले विचार इतरान पर्यंत पोहचवण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. अश्या जहाल विचार सारणी बरोबरच आपले सर्वस्व देशसाठी अर्पण करून समाज कार्य करणाऱ्या अश्या नेत्यांचा आदर्श आजच्या पिढीने आपल्या समोर ठेऊन समाज सेवा करावी. म्हणजे आजही समाजाला नवीन दिशा मिळेल . 

बुधवार, ९ जुलै, २०१४

Aamhi Savitrichya Leki

        सावित्री बाई फुले म्हटल्या बरोबर लहान मुलाला आई हा शब्द ऐकल्यावर जसे वाटते ना ? अगदी तसेच आम्हां मुलींना वाटते .  आई ह्या शब्दातच इतकी प्रचंड शक्ति आहे कि सारे जग एका बाजूला आणि आई एका बाजूला . अगदी तसेच आज सावित्री बाई फुलें यांच्या क्रांतिकारी निर्णया मुळेच आजच्या विसाव्या शतकात , आपल्या पंखात विद्वत्तेचे   बळ  घेऊन नाव- नवीन शिखरे पादांक्रांत करीत आहोत.  याची जननी , माता , आई ह्या सावित्री बी फुलेच आहेत. हे सत्य सूर्य प्रकाश इतकेच खरे आहे. 
          सावित्री बाईंचा सातारा येथे झाला. एकोणिसाव्या शतकात जेंव्हा समाजात ब्राह्मणांचे वर्चस्व होते तेव्हा समाजात फार विषमता होती . स्पृश्य -अस्पृश्य , जाती -पाती ,सती प्रथा , बाल विवाह , अनिष्ठ रूढी , परंपरा यांनी समाज वेढलेला होता . त्या काळी मुलींना शिक्षण दिले जात नसे . महात्मा ज्योतिबा फुले हे सावित्री बाईंचे पती  ते समाज सुधारक म्हणून ओळखले जात . त्यांनि  समाजातील विषमतेचा अभ्यास केला . तेंव्हा त्यांना असे दिसून आले कि घर चालवणारी घरची स्त्री हीच मुळात अशिक्षित आहे. तिला भल्या बुर्याची जाणीवच  नाही . मग परिवर्तन कसे होणार? त्यावर त्यांनी एक उपाय काढला प्रत्येक घरातील मुलगी शिक्षित झाली तर तिचे कुटुंब शिक्षित होईल. पर्यायाने संपूर्ण समाज सुधारण्यास गती मिळेल . त्यांनी ठामपणे निर्णय केला . एका द्रुढ निश्चयाचा संकल्प सोडला . आज या क्षणा  पासून सुरवात करायची . त्यांनी योजनेला स्वताच्याच घरा पासून सुरवात केली . त्यांनी व त्यांची पत्नी सावित्री बाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली ; ती स्वतःच्या शेतात . शेतातील मातीवर आंब्याच्या काठीने अक्षरे गिरवायला शिकवले जाई . या विद्यालयात "सगुणा बाई क्षीरसागर व सावित्री बाई फुले"हेच तिचे विश्व राहिले असते.  या पहिला विद्यार्थिनी होत्या . सावित्री बाईंची भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून इतिहासात गौरवशाली नोंद केली गेली . 
          त्या कालच्या काळच्या धर्म पंडितांनी आकांड -तांडव केले. त्यांना अश्लील शिव्या दिल्या , त्यांच्या वर वाईट आरोप केले, त्यांना दगड मारले , त्यांच्यावर शेणाचे गोळे फेकले . धर्म बुडवल्याचे आरोपही केले. तर एका धटिंगणाने रस्त्यात त्यांचा हात पकडला . या अनपेक्षित हल्ल्याने प्रथम त्या बावरल्या . क्षणातच त्यांनी त्या धटिंगणाच्या मुस्काटात एक लगावून दिली . या प्रकार मुळे पुढे त्यांच्या छळ थोडा कमी झाला . असे नाना विध छळ  सोसून मोठया जिद्दीने त्यांनी पुण्यातच ३ शाळा काढल्या आणि महिलांना शिक्षण देण्याचे खडतर व्रत आरंभिले . 
             त्यांच्या तपस्येतूनच आजची महिला शिक्षित झाली .  नव- नवीन क्षितिजे पादांक्रांत करण्याचा मान सावित्री बाईंच्या खडतर तपस्ये मुळेच त्यांना मिळाला . सावित्री बाई फुले नसत्या तर आज इंदिरा गांधी , कल्पना चावला , शुषमा स्वराज , सानिया मिर्झा  याही झाल्या नसत्या . आजची नारी आधुनिक झाली नसति. तिची धांव फक्त घराच्या कुंपणा पर्यंतच मर्यादित राहिली असति. फक्त "चूल आणि मुल" हेच तिचे विश्व राहिले असते. दिगन्ताच्या परिघात तिला अस्तित्वच राहिले नसते. म्हणूनच आम्ही गर्वाने म्हणतो. "आम्ही सावित्रीच्या लेकी "   जय महाराष्ट्र !